शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये असलेला तांदूळ, डाळी/ कडधान्यांचे विद्यार्थ्यांना वितरण करणेबाबत...
१) शाळेचे मुख्याध्यापक/ योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तांदूळ व डाळी/ कडधान्यांचा शिल्लक साठा विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन करावे.
२) विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळी /कडधान्य वाटपाबाबत शाळा स्तरावरून प्रसिद्धी करण्यात यावी.
३) तांदूळ व डाळी कडधान्य वस्तू नेण्यासाठी सुचित करून शाळा स्तरावरून गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी /त्यांचे पालक यांना टप्प्याटप्प्याने शाळेमध्ये बोलवावे. तांदूळ व डाळी /कडधान्य इत्यादी वस्तूंचे वाटप करावे उपस्थित असणारे विद्यार्थी /पालक यांना एकमेकांपासून रांगेत 1 मीटर अंतरावर उभे करावे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे तांदूळ व डाळी /कडधान्य घरपोच करण्याचे नियोजन करावे.
४) तांदूळ व डाळी /कडधान्य वाटप करतेवेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता द्यावयाच्या खबरदारी बाबत दिलेले आदेश व सुचनांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
If you have any doubts, please let be know.