इ. ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सृजनात्मक लेखन स्पर्धा
इ.7 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना Times of India Network चा Times bridge हा एक विभाग, Wattpad (social story telling platform)आणि राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सृजनात्मक लेखन स्पर्धा
घेण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
इयत्ता व विषय
इ. 7 वी ते 8 वी साठी-
" आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेल्या कोरोना हिरोची कहाणी"
शब्दमर्यादा- 200 शब्द
************************
इ. 9 वी व दहावी साठी-
" वर्ष 2020 बद्दल आपले मत काय आहे आणि 2021 कसे चांगले
असू शकते"
शब्दमर्यादा- 300 शब्द
************************
इ. 11वी आणि 12 वी साठी-
"वर्ष 2030 साठी
आपले भारताचे काय मत आहे"
शब्दमर्यादा- 500 शब्द
************************
- स्पर्धेस सुरुवात - शुक्रवार दिनांक: - 25/12/2020
- स्पर्धेची शेवटची तारीख: - 27/1/2021
- परिक्षण कालावधी दिनांक:- 18/1/2021 ते 24/1/2021
- निकाल घोषित दिनांक:- 26/1/2021
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
पुढे दिलेल्या लिंकचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले Wattpad (Social storytelling platform) मध्ये स्वतःचे account तयार करावे
आणि त्यातील comment
section मध्ये आपली गोष्ट
/निबंध लिहावा.
https://www.wattpad.com/user/MaharashtraGovt
(Profile Link – भाषा निहाय पुढीलप्रमाणे ३ लिंक आहेत . )
(English)
https://www.wattpad.com/996825604-writing-contest-english
(Hindi)
https://www.wattpad.com/996840905-writing-contest
(Marathi)
https://www.wattpad.com/996843192-writing-contest
****************************
वेबसाईट खाते तयार व्हीडीओ Websiteaccount creation video
ॲप डाऊनलोड आणि खाते तयार व्हिडीओ App download and account creation video
मोबाईल बॅक खाते तयार करणे Creating mobile web account
नाव:-आठरे सुवर्णा राजेंद्र.वर्ग:-१२ वी(सायन्स).काॅलेजचे नाव:-श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी.जि.:-अहमदनगर .
विषय:-"माझ्या स्वप्नातील २०३० सालामधील भारत"
नको नको ती द्वाड रातीचे कर्कश अंधारे!मला हवीत झगमगणारी सूर्य प्रकाश अन तारे!!
माझा भारत देश सुख समृद्धि ने नटलेला आहे. तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला भारत,जैविक शेतीने भरभराटीस आलेला भारत,पर्यावरण पूरक,निसर्गाने नटलेला भारत,येणार्या २०३० सालामध्ये काय काय प्रगती करनार आहे हे मला बगायच आहे.दुसरा आणि हल्लीच्या दिवसातील महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्री सुरक्षितता.ज्या भारतात स्त्रीयांना समानतेचा हक्क दिला, शिक्षनाचा हक्क दिला, सन्मानाची वागणूक दिली याच आपल्या महान भारत देशात स्त्रीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.मला असे वाटते माझ्या स्वप्नातील २०३० साल स्त्रीयांना समानतेचे व सुरक्षिततेचे असेल. आज भारतात खूप समस्या घर करून बसल्या आहेत. आतंकवाद, अवैचारिक विवाद, जाती भेदभाव, महापुरुषात वाटून घेतलेला समाज , हे सर्व घातक विचार उखडून जावेत आणि मला असे वाटते २०३० सालामध्ये हे होईल.
माझ्या भारत देशाने विविध पर्व पाहिलेले आहेत.मला ही एका सोनेरी पर्वाचे साक्षिदार व्हायला नक्की आवडेलआवडेल. त्यासाठी भारत, माझ्या स्वप्नातील २०३० सालामधील भारत उभा राहण्यासाठी एक क्रांति पर्व पेटले पाहिजे!! देश प्रेमाची एकतेची लाट जनसमुदायात पसरली पाहिजे. कृषी क्रांती, मानव क्रांती, पर्यावरण समतोल, शैक्षणिक प्रगती या सर्व गोष्ठींचा पर्व तयार होऊन येणारे २०३० साल नक्की प्रगतिशील ठरेल .
तसेच या भारत देशात शेतकर्याला उच्च दर्जा दिला जाईल तेव्हा कुठे माझ्या स्वप्नातील भारताचा अर्थ होईल किंवा मोठा विकास होईल. कृषी उन्नति घडत असताना जैविक शेतीची पीकं उभी राहिलेली मी येणारे २०२० सालामधील भारतासाठी मी कृषी पूर्ण भारत असे स्वप्न पेरते.
शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा सुधारताना आणि त्या सपूर्णत्व शिक्षणाने भारताचा एक एक तरुण बेरोजगारीला धूल चारत जगाच्या नकाशावर प्रगतीचे गाणे गाताना मी २०३० सालासाठी मी स्वप्न पाहते.पाहिली जाणारी स्वप्ने मनाला मोहरून टाकतात . उगवत्या सूर्याप्रमाने या घातक गोष्ठींचा अंत या भारत भूमि ने मोठ्या दिमाखात उभं राहिलेल मला बगायच आहे.
नाव:-आठरे सुवर्णा राजेंद्र,
उत्तर द्याहटवाइयत्ता:-१२वी(सायन्स),
काॅलेजचे नाव:-श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी,
जि.:-अहमदनगर.
विषय:-"माझ्या स्वप्नातील २०३० सालामधील भारत"
नको नको ती द्वाड रातीचे कर्कश अंधारे!
मला हवीत झगमगणारी सूर्य प्रकाश अन तारे!!
माझा भारत देश सुख समृद्धि ने नटलेला आहे.माझ्या भारत देशाने विविध प्रकारची प्रगती केलेली आहे.भारत देश प्रचिन इतिहास आणि विविधतेने नटलेला आहे.तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला भारत, सुसंस्कृतीने संस्कारक्षम असलेला भारत, जैविक शेतीने भरभराटीस आलेला भारत, धर्मनिरपेक्ष, जाती पातीच्या विचारांना आहुती देऊन प्रगतीकडे वाटचाल करणारा भारत, अभ्यासू आणि योग्य दिशेने देशाला वाट दाखवणारा राजकीय भारत, पर्यावरण पूरक,निसर्गाने नटलेला माझा भारत येणार्या २०३० सालामध्ये काय काय प्रगती करनार आहे हे सर्व मला बगायच आहे.
आज भारतात खूप समस्या घर करुन बसल्या आहेत.आतंकवाद,अवैचारिक विवाद, जाती पातीचे भेदभाव,महापुरुषात वाटून घेतलेला समाज, अशक्त झालेले पर्यावरण हे सर्व घातक विचार देशातून उखडून जावेत आणि त्यांचे अंत्यसंस्कार होताना चे स्वप्न मी येणार्या सालासाठी पाहत आहे.
दुसरा आणि हल्लीच्या दिवसातील महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्री सुरक्षितता.ज्या भारतात स्त्रीयांना समानतेचा हक्क दिला,सन्मानाची वागणूक दिली,शिक्षनाचा हक्क दिला, याच आपल्या महान भारत देशात स्त्रीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.येणारे २०३० साल हे स्त्रीयांना समानतेचे व सुरक्षिततेचे असेल.तसेच मुलांना पहिली शिकवन दिली जाईल ती म्हणजे स्त्री सुरक्षितता आणि स्त्रीयांचा आदर करण्याची.
माझ्या भारत देशाने विविध पर्व पाहिलेले आहेत.मला ही एका सोनेरी पर्वाचे साक्षिदार व्हायला नक्की आवडेल.त्यासाठीचा भारत, माझ्या स्वप्नातील भारत उभा राहण्यासाठी एक क्रांती पर्व पेटले पाहिजे! देशपप्रेमाची व एकतेची लाट जनसमुदायात पसरली पाहिजे. या सर्व गोष्ठींचा पर्व तयार होऊन येणारे साल जगाच प्रतिनिधित्व करताना मला बगायच आहे.
या भारत देशात शेतकर्याला उच्च दर्जा दिला जाईल तेव्हा कुठे माझ्या स्वप्नातील भारताचा अर्थ होईल.विज्ञानाशी एकरूप होत असताना सुसंस्कृत भारत म्हणून एक विकसित संप्रदाय होताना मी भारतास स्वप्नामध्ये साकारते.कृषी उन्नति घडत असताना जैविक शेतीची पीकं उभी राहिलेली मी येणार्या २०३० सालासाठी कृषी पूर्ण भारताचे स्वप्न पेरते.शिक्षन आणि शिक्षनाचा दर्जा सुधारताना आणि त्या सपूर्णत्व शिक्षणाने भारताचा एक एक तरूण बेरोजगारीला धूल चारत जगाच्या नकाशावर प्रगतीचे गाणे गाताना मी येणार्या सालासाठी स्वप्न पाहते.
अंत्यसंस्कार होताना पाहिली जानारी स्वप्न मनाला मोहरून टाकतात. एका उगवत्या सूर्याप्रमाने या घातक गोष्ठींचा अंत करत या भारत भूमिने मोठ्या दिमाखात उभं राहिलेल स्वप्न मी येणार्या २०३० सालासाठी पाहत आहे.जगाच प्रतिनिधित्व करताना मला बगायच आहे.
स्वप्न होतात साजिरे ती होतात गोजिरे !
वैभव येण्या स्वप्नापरि स्वप्न यावी पहाटे !!